करोनाच्या संकटात तरी विरोधकांनी राजकारण करू नयेः उदय सामंत
Coronavirus India Updates: politics Maharashtra case count crosses ..करोनाच्या संकटात तरी विरोधकांनी राजकारण करू नयेः उदय सामंत
मुंबईतील नागरिकांना गावी जायला कोणीही विरोध केला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांचे जिल्ह्याधिकारी, पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून फक्त गावी येणाऱ्या लोकांना परवानगी देताना मर्यादित प्रमाणात द्यावी, असे म्हटले आहे. पण त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ती वस्तुस्थितीला धरून नाही. सिंधुदुर्गच्या किंवा रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात येणाऱ्यांना परवानगी देऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

uday-samant
Coronavirus India Updates: politics Maharashtra case count crosses ..करोनाच्या संकटात तरी विरोधकांनी राजकारण करू नयेः उदय सामंत
सध्या गावोगावी मुंबईहून आलेल्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. खारेपाटण पुलावर तर खूपच गर्दी होत आहे. त्यावर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. गावोगावी ज्या शाळा इमारती आहेत तिथे पुरेशा सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत गावपातळीवरच्या समितीवर मोठा ताण आला आहे.
चिंताजनक! राज्यात आज २३४७ नवे करोनाग्रस्त; ६३ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, सिंधुदुर्गातील बाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. आठ पैकी आता चारच रूग्ण उपचार घेत आहेत. इतर चार जण पूर्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना हा एक दिलासा मिळाला आहे.
No comments:
Post a Comment