*📣विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र*
____________________________________
*Stay@home: Fight Corona Save India*
―――――――――――――――――――――
⚡कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यपालांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे.
💫मे महिना संपत आला तरी राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे मला विद्यापीठांचे कुलपती नात्याने तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे असं राज ठाकरे यांनीया पत्रात म्हटलं आहे.
💁♂️राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परिक्षा रद्द करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी युजीसी ( विद्यापीठ अनुदान आयोगाला) पत्र पाठवलं होतं.
📝या पत्राबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर हा अंतिम वर्षतील अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा असं या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री यांना सांगितलं होतं.
📍आता या प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेतली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्या आणि यामध्ये कोणत्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.
💥
*👍🏻"
No comments:
Post a Comment