स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याला राज ठाकरे यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. (Raj Thackeray warns Yogi adityanath)
Raj Thackeray | warns Yogi adityanathमुंबई: 'उत्तर प्रदेशातील मजूर व कामगारांना ह्यापुढं महाराष्ट्रात येताना महाराष्ट्र सरकारची व पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा त्यांना येता येणार नाही,' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे. (Raj Thackeray warns Yogi adityanath)उत्तर प्रदेशचे कामगार हवे असतील तर ह्यापुढं आमची परवानगी घ्यावी लागेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. योगींच्या या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी लगेचच मनसेची भूमिका मांडली आहे. 'योगी आदित्यनाथांची हीच भूमिका असेल तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की ह्यापुढं महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची आणि आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही,' असं राज यांनी म्हटलं आहे.राज ठाकरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 'महाराष्ट्र सरकारनंही या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं. ह्यापुढं कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी. पोलीस ठाण्यात त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख याची नोंद असली पाहिजे तरच महाराष्ट्रात त्यांना प्रवेश द्यावा. हा नियम महाराष्ट्रानं कटाक्षानं पाळावा,' अशी मागणीही राज यांनी केली आहे.
For More News Read Also https://india24hoursnews1.blogspot.com/
|
No comments:
Post a Comment