India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 1, 2020

Tigers in India: देशात लॉकडाऊन काळात २८ वाघांचा ...


देशात लॉकडाऊन काळात २८ वाघांचा मृत्यू | india news 









जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के भारतात आहेत. २००६मध्ये भारतात केवळ १,४११ वाघ उरले होते. गेल्या दहा वर्षांत वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. २०१८च्या आकडेवारीनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ आहेत.

tiger
tiger

पंकज मोहरीर, चंद्रपूर
देशात व्याघ्रसंवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना मागील पाच महिन्यांत ४५ वाघांचा मृत्यू झाला. त्यातील २८ व्याघ्रमृत्यू लॉकडाऊन काळातील असल्याची माहिती समोर आली आहे.
जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के भारतात आहेत. २००६मध्ये भारतात केवळ १,४११ वाघ उरले होते. गेल्या दहा वर्षांत वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. २०१८च्या आकडेवारीनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ आहेत. मागील चार वर्षांत राज्यातील वाघांच्या संख्येत ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२वर पोहचली आहे. पण, चालू वर्षात आतापर्यंत ४५ वाघांचा मृत्यू झाला आहे. यातील ६४ टक्के घटना व्याघ्रप्रकल्पातील अतिसंरक्षित भागात झाल्या आहे. परिणामी आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
२३३ बिबट्यांचा मृत्यू
मागील काही वर्षांत बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली होती. २०१८मध्ये ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला होता. तर २०१९मध्ये ४९१चा आकडा नोंदविण्यात आला. चालू वर्षात मागील पाच महिन्यांत देशात एकूण २३३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यात १७० बिबटे मृत्यूमुखी पडले असून शिकार व जप्तीतून ६३ मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.






No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages